Type Here to Get Search Results !

निंबोळी अर्क ठरेल कीटकनाशकाचा पर्याय....


निंबोळी अर्क ठरेल कीटकनाशकाचा पर्याय.....
  ग्रामीण भागात कडुनिंबाची झाडे भरपूर आहे.या झाडांना भरपूर निंबोळ्या असून त्या परिपक्व होत आहेत.प्रत्येक शेतकऱ्याने निंबोळी अर्क तयार करण्याचे आव्हान रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी दिले.25 किलो निंबोळी गोळा केल्या तर त्यापासून 5% अर्क तयार होऊ शकतो.निंबोळी अर्क बनवण्याची प्रक्रिया साधी- सोपी असून ती सोयाबीन ,कापूस सारख्या पिकांवर फवारणी केल्यास किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.निंबोळी अर्काचा फवारणी केल्यास किडींचा खाण्याचा वेग मंदावतो.तसेच किडींचा अंडी घालण्याची गती कमी होते.निंबोळी अर्काचा फवारणी केल्यास पिकांची पाने कडू होतात आणि अशी पाने कीटक खाणे टाळतात आणि उपासमारी मुळे त्यांचा मृत्यू होतो.निंबोळी अर्काचा कडू वासामुळे मादी कीटक पानांवर अंडी घालत नाहीत त्यामुळं त्यांची पुढील पिढीच तयार होत नाही. निंबोळी अर्काच्या फवारणीमुळे किटकांत नपुसकाता येते.पिकांचा वास कडू येत असल्यामुळे कीटक झाडांवर बसणे टाळतात.
 अश्याप्रकारे रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील कृषी कन्या श्रद्धा पोळ, प्रियंका नवले,मोहिते कोमल,ऋतुजा महारनवर,प्रतीक्षा देशमुख ,गीता जाधव,श्वेता जाधव, काझी अतिया,प्रेरणा माने देशमुख,ज्ञानेश्र्वरी शिंदे, यांनी किटकांवर निंबोळी अर्काचा काय परिणाम होतो? फवारणी केव्हा करावी? याची माहिती भंडीशेगाव येथे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक घेऊन सांगितले . 
रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जी .नलावडे,कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एम. एकतपुरे,कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. एम .चंदनकर , प्रा. एच. एस खराडे यांनी मार्गदर्शन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad