महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज तर्फे आयोजित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव 2023-24 अंतर्गत भंडीशेगाव येथे रेशीम उद्योग कसा करावा हे शिबिर शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाचे समन्वयक अधिकारी प्रा. एस. एम.एकतपुरे तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. एम .चंदनकर , प्रा.एच. एस. खराडे, डॉ.वाय. टी .जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार कृषी कन्या कोमल मोहिते,गीता जाधव, श्रद्धा पोळ, प्रतिक्षा देशमुख,प्रियंका नवले, ऋतुजा महारनवर,अतिया काझी, श्वेता जाधव, ज्ञानेश्वरी शिंदे, प्रेरणा माने- देशमुख यांनी शेतकऱ्यांना रेशीम उद्योग कसा करावा व त्याचे फायदे काय आहेत याचे महत्त्व पटवून दिले. यावेळी भंडीशेगाव मधील सरपंच मनिषा यलमार, उपसरपंच विजय कदम, संजय रणखांबे ,ग्रामसेवक जी. बी. नरसाळे, मंगेश ननवरे ,प्रियंका ननवरे, राणी ननवरे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.
भंडीशेगाव येथे रत्नाई कृषी महाविद्यालयांच्या कृषी कन्यांचे जागरूकता शिबिर
गुरुवार, मार्च ०७, २०२४
0
Tags