भंडीशेगाव येथे कृषीकन्यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद
भंडीशेगाव महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी ई-पीक पाहणी योजना आणली असून त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, त्यासाठी रत्नाई कृषी महाविद्यालयांच्या कृषीकन्या ज्ञानेश्वरी शिंदे,अतिया काझी, श्वेता जाधव, प्रेरणा माने देशमुख, प्रियंका नवले, श्रद्धा पोळ, प्रतिक्षा देशमुख, कोमल मोहिते, गीता जाधव,ऋतुजा महारनवर यांनी मार्गदर्शन केले. पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव परिसरात शेतीची ई-पीक पाहणी करण्यात आली.यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला व तांत्रिक बाबींची माहिती दिली. आतापर्यंत शेतकऱ्यांना
पेरण्यांची नोंदही संबंधित गावाच्या तलाठ्यामार्फत करावी लागत होती. त्यामुळे नुकसान भरपाई देतेवेळी अडचणींचा सामना करावा लागत असे. 'ई-पीक पाहणी अॅपद्वारे शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंदणी होणार आहे, असे कृषीदकन्या यांनी सांगितले. यावेळी गावातील शेतकरी व ज्येष्ठ मंडळी उपस्थिती होती. कृषिदूतांना महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलवडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एम. एकतपुरे व कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. एम चंदनकर, प्रा. एच. एस. खराडे, प्रा. एस. आर. आडत यांचे मार्गदर्शन लाभले.