राज्य सरकारने झोन बंदी कायद्याचे हत्यार उगारून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे धोरण आखले आहे यंदा पाऊसाअभावी ऊस जळून गेले उर्वरित जो ऊस आहे त्याला सोन्याचा भाव मिळतो का काय अशी अपेक्षा आसताना सरकारने झोनबंदी करून शेतकऱ्यांची आर्थिक नाडी दाबण्याचा प्रयत्न केला आहे सरकारने झोनबंदी जर नाही उठवली तर शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय रहाणार नाही असा ईशारा रयत क्रांती संघटनेचे राहुल बिडवे यांनी दिला
यावेळी रयत क्रांती संघटनेच्या माळशिरस तालुका अध्यक्ष पदी नाना कोळी व सोशलमिडिया तालुका अध्यक्ष पदी रोहित रणदिवे यांची निवड करण्यात आली माळशिरस तालुक्यातील बंगल्यावरुन चालणारे राजकारण हे शेतावरच्या बांधावर आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे राहुल बिडवे यांनी सांगितले यावेळी रणजित चव्हाण,सुधाकर पांढरे,आण्णा म्हसवडे,राजकुमार ठोकळे उपस्थित होते.