विठ्ठलवाडी ( भानुदास गायकवाड)
सगळीकडे गणपतीबाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी चालू , चाकरमान्यांची कोकणात जाण्यासाठी वर्दळ वाढली असून सगळीकडे कोकणात ,गावी जाण्यासाठी नागरिक लाखोच्या संख्येने बस स्थानकात दाखल होत आहेत , कल्याण बस स्थानकात स्मार्ट सिटीच्या अंतर्गत कामे चालू असल्यामुळे बराच भार विठ्ठलवाडी बस स्थानकावर पडला आहे , पण तेथील होत असलेली नागरिकांची गैरसोय पाहता ,नागरिक फार त्रस्त झालेले दिसतात, अनेक लहान मुले स्त्रिया , यांना तेथील स्वचछतागृह हे मृतावस्थेत असल्यामुळे व मोडकळीस
आल्यामुळे ते वापरण्याजोगे राहिले नाही , त्या मुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहेत ,
*मनसे शाखाध्यक्ष युवराज कांबळे* यांनी या वेळी प्रवाश्यांना होणारr त्रास लक्षात घेऊन. डेपो मुख्य प्रबंधक याना भेटून प्रवाश्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती दीली ते त्वरित सुस्थितीत बांधून घ्यावे , व नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी ,असे आश्वासन मुख्य प्रबंधक यांच्या कडून घेण्यात आले
आता प्रशासन यावर काय भूमिका घेते की येरे माझ्या मागल्या अशी भूमिका घेते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.