मोहोळ तालुक्यातील बैरागवाडी येथील शेतकरी समाधान तनपुरे यांनी घेतले खरबूज पिकांमधून विक्रमी उत्पादन,सव्वा एकर शेती मधून १६ ते २० टन खरबुजाचे उत्पादन मिळणार आहे यामधून त्यांना अंदाजे ९ ते १० लाख रुपये उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.
दिल्ली येथील व्यापाऱ्यांना जागेवरती 51 रुपये किलो दराने खरबुजाची खरेदी केली असून खर्च वजा जाता त्यांना निव्वळ नफा ७ ते ८ लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे
सेंद्रिय शेती वर जास्त भर देऊन गरजेपुरतचं केमिकलचा वापर करून शेतकऱ्याने दुष्काळ परिस्थितीवर मात करत घेतले खरबुजा मधून भरघोस उत्पादन हे उत्पादन घेण्यासाठी त्यांना साधारणपणे १ ते १.५ लाखापर्यंत खर्च आला असून खर्च वजा जाता त्यांना ७ ते ८ लाख रुपये निव्वळ नफा मिळणार आहे
यावेळी शेतकरी समाधान तनपुरे म्हणाले यासाठी ग्रीन इंडियाचे प्रतिनिधी.सिद्धेश्वर माने आष्टी यांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केल्यामुळे चांगल्या पद्धतीचे उत्पादन घेता आले.