Type Here to Get Search Results !

अर्धापूर येथील बालाजी नवरात्र उत्सवाची 34 वर्षाची परंपरा आजही कायम.




अर्धापूर येथील बालाजी नवरात्र उत्सवाची 34 वर्षाची परंपरा आजही कायम.     
    
अर्धापूर पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या बालाजी नवरात्र उत्सवाचे परंपरा प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही जोमाने सुरू आहे, 
दररोज सकाळी 6 वा श्री बालाजीला रुद्र अभिषेक व 7 वा,आरती होते सकाळी 10 ते 12 या वळेत व्यंकटेश विजय ग्रंथाचे पारायण व दुपारी 12 वा विशेष आरती होऊन महाप्रसाद व अन्नदान वाटप करण्यात येते सायंकाळी 7 वाजता आरती होऊन लगेच 7 ते 10 या वेळात भजन कीर्तन व प्रवचन इतर धार्मिक कार्यक्रम होतात. हे सर्व कार्यक्रम बालाजी मंदिराचे मुख्य पुजारी गजू महाराज पळसकर तसेच लक्ष्मीकांत मुळे ( गुरु) यांच्या मार्गदर्शना खाली होतात. 

 बालाजी मंदिराचे अध्यक्ष जगदीश भुतडा,प्रवीण देशमुख,शामराव देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभते व शेवटी विजय दशमीच्या दिवशी सकाळी 9 ते 12 यावेळेस अर्धापूर येथील मुख्य रस्त्याने श्री बालाजी ची विशेष पालखी निघून. ठीक 12 वा महाआरती होऊन महाप्रसादाचे वाटप होते सायंकाळी 8 वा बालाजी ची शेज आरती होऊन नवरात्र महोत्सवाची सांगता होते.

 नवरात्र महोत्सव कार्यक्रमा सहकार्य शंकर पांचाळ,कोंडीबा आंबेगावकर, मधुकर जवादवार,पंपट्वार,पिराजी साखरे,माधव साखरे,नामदेवराव माटे, बालाजी मोटरवार,राजेश पळसकर व समस्त ग्रामस्थांचे सहकार्य लाभते आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News