राज्य परिवहन महामंडळानं आपल्या बससेवेत काळानुरूप बदल केले असून महामंडळाच्या बसच्या माध्यमातून सुरक्षित अणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. गुणवत्ता वाढीसाठी आणि नवीन बदल करून प्रवाशांना सुरक्षित प्रवास देणं हे एसटीचं ध्येय आहे. याच उद्दिष्टावर आधारीत प्रदूषण विरहित, आवाज विरहित 'शिवाई' बस आहे.
नागरिकांनी निश्चितपणे या बससेवेचा लाभ घ्यावा. समाजातील सर्व घटकांना एसटीची सेवा आपली वाटली पाहिजे यासाठी सर्व सोईसुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नजिकच्या काळात प्रत्येक आगारात विद्युत प्रभारक केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. राज्य सरकार त्यासाठी आवश्यक सहकार्य करीत आहे. एसटीवरचा जनतेचा विश्वास संपादन करणं महत्त्वाचं आहे. प्रवाशांना सुरक्षितरित्या प्रवास करता यावा यासाठी व्यवस्था वाढवण्यात येत आहेत.
प्रवाशांच्या गरजा ओळखून एसटीनं काळानुरूप अनेक बदल केले. निमआराम, वातानुकूलित बस, अश्वमेध, शिवनेरी अशा बससेवा सुरू करण्यात आल्या. २०१७ मध्ये शिवशाही बस महामंडळाच्या सेवेत समाविष्ट करण्यात आली आणि आता विद्युत घटावर चालणारी बससेवा सुरू होत असून हा महत्त्वपूर्ण प्रसंग आहे. शिवाई बसमध्ये वायफाय यंत्रणा देण्यात आली आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी याचा उपयोग होईल.
प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी शासन सर्वांच्या बरोबर आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ७४ वर्षाच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या चालक, वाहक, अधिकारी, कर्मचारी यांना धन्यवाद देतो. एसटीच्या इंधनावर होणारा खर्च वाढला आहे. गेल्या वर्षात शासनानं २ हजार ६०० कोटींची मदत केली.
zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
एसटीला समस्येतून बाहेर काढण्यासाठी कायमचा उपाय शोधण्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग शोधण्यात येत आहेत. फायदेशीर मार्गावर येणारा महसूल अन्य मार्गावर वळवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी लागेल. नव्या सुविधा देऊन महसूल वाढवण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहेत.