स्वाभिमानी शेतकरी संघटना |
चालू गळीत हंगामातील उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये प्रमाणे त्वरित ऊस बिल मिळावे ,चौदा दिवसांच्या आत एफआरपी देणे बंधनकारक असताना पंचवीस दिवस झाले कारखान्याने ऊस दर जाहीर केला नाही त्यामुळे त्वरित ऊसबिल जाहीर करावे ,मागील वर्षीचे एफआरपी अधिक चारशे रुपये त्वरित मिळावे ,सिद्धेश्वर मातोश्री गोकुळ या कारखान्यांनी ऊसबिल जमा केल्याचे खोटी माहिती साखर आयुक्तांना दिली आहे यांची त्वरित चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी .यावेळी महामुद पटेल विजय रणदिवे उमाशंकर पाटील नरेंद्र पाटील शिवाजी भाऊ पाटील सिद्धेश्वर घुगे गोपाल घाडगे श्रीमंत शंकर संघ शेट्टी महावीर सावळे नरहरी वारे इकबाल मुजावर पंडित चव्हाण तात्या सावंत सह परिसरातील शेतकरी उपस्थित आहेत .उमाशंकर पाटील ,स्वा.शेतकरी संघटना सचिव. सोलापुर
वरील मागण्या सहकार मंत्र्यांनी त्वरित पूर्ण करावे व जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा सोडवावा अन्यथा हे आमरण उपोषण असेच चालू राहील . .