कल्याण डोंबिवली महानगर पालिका नेहमीच वादाच्याभोऱ्यात आपण बघत व एकत आलो आहे , आज कल्याण डोंबिवलीत वाहनाने जायचं बोलेतर बोटींनी प्रवास केल्याची अनुभूती येते.
या मुळे कित्तेक वेळा नागरिकांना अनेक समश्यांना तोंड द्यावे लागते ,वाहतूक कोंडी , त्यात अपघात हे कल्याणडोंबिवली च्या नागरिकांच्या जसे आयुष्याला पुजलेले आहेत का असा सवाल् नागरिकांन मधून विचारला जातोय यातच डोंबिवलीचे वाहतूक विभाग या खड्ड्यांच्या समश्यावर तात्पुरत्या तोडगा काढण्यासाठी व थोडा वेळ तरी नागरिकांना आराम होईल या साठी रस्त्यावर उतरून चक्क पडलेले खड्डे भरताना आज डोंबिवलीमध्ये बगायला मिळाले , वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक ही तिथे उपस्थित होते , वाहतूक पोलिसांकडून नेहमीच असे प्रशंसनीय काम होताना आपण रोज पाहत आहोत ,हे पाहून तरी प्रशासनाला जाग येईल अशी आपण अशा करू .
प्रतिनिधी /भानुदास गायकवाड