मुरबाड दि ८ प्रतिनिधी लक्ष्मण पवार
मुरबाड तालुक्यात भिमाशंकर, क़ळसूबाई ,हरिचंद्रगड, या तीन अभयार-यांच्या हदिदत येथील ७५ गाव येतात, या अभयारण्यात वनविभागाच्या कार्यक्षेत्रात, सर्वत्र "जंगलराज" सुरू असून, एका बाजूला शासन वनिकरणा-या नावाखाली त्याच त्याच खड्ड्यात कोट्यावधीची वृक्षलागवड मोहिम राबवत आहे ,या अभयअरण्य क्षेत्रात वाढती वृक्षतोड, पाण्याचा तुटवडा, जंगलांच सपाट माळराण झाल्याने व वन्य प्राण्याच्या अस्तीत्वावरच घाला घातला गेल्याने ,वन्यप्राण्याची अन्ना विना उपासमारी,सुरू झाली ,खाण्यासाठी काहीही उपलब्ध नसल्याने वन्यप्राणी माकडं हरीण,भेकरं ससे, रानटी- डुक्कर,निलगाय,ई, प्राणी गाव वाड्या वस्तकडे अन्नव पाण्याच्याशोधात येतात त्यांचा माग (शोधघेत)काढीत वाघ, लांडगे तरसं बिंबट्या सारखे हिस्त्रप्राणी देखीस गाव वाड्या पाड्या लगत आले आहेत आज कोरावळे गावालीगतच्या एका लहान डॅम लगतच्या जंगलात एक बिबट्या मृत झालेला व सडलेल्या अवस्थेत काही नागरिकांना दिसून येत त्यांनी वनविभागाला कळविले सदरहू बिबट्या चा मृत्यू नॅचरल कि अपघात हे पोष्टमार्टम च्या निदाना वरून कळून येईल परंतु या बिबट्याचा मृत्यू हा मुरबाड पुर्वच्या हददित झाला असून याची माहिती मिळावी म्हणून संपर्क केला असता वनरक्षक न निकम यांनी केवळ हॅलो हॅलो करीत वेळ मारून नेली तर ठाणे सिसिएफ रामाराव यांना संपर्क केला असता माहिती देतो असे सांगितले मात्र ठोस माहिती मिळून आली नाही वनविभागाला याच काहिच सोयर सुतक असल्याचे दिसून येत आहे