महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष एकत्र होतो. यापुढेही विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आमचा एकच उमेदवार असणार आहे. सरकार गेल्यानंतर आम्ही एकत्र बसून चर्चा केलेली नाही, पुढील काळात एकत्र बसून पुढील धोरण ठरवू. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत जिथे जिथे शक्य होईल, तिथे तीनही पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करु, असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
तसेच संजय राऊत यांना ईडीची नोटीस आली असून ते चौकशीला सामोरे गेलेले आहेत. ते निर्दोष असून त्याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही. आजच्या चौकशीनंतर ईडीचे दिल्लीतले अधिकारी काय निर्णय देतात हे पाहावे लागेल. संजय राऊत यांच्याविरोधात ईडी जाणीवपूर्वक टोकाची भूमिका घेणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Jayant Patil - जयंत पाटील