ऐतिहासिक महापुरूषांची स्मारकं उभी करत असताना शहर रचनेच्या दृष्टीने फार विचार करावा लागतो. कारण ही स्मारकेच या शहराच्या इतिहासाचे, संस्कृतीचे आणि अस्मितेचे मानबिंदू ठरत असतात. शहराची शोभा वाढवणारी व पर्यटकांच्या आकर्षणाची स्थळे बनतात. अशाच प्रकारचे श्री शिवछत्रपती महाराजांचे हे अश्वारूढ स्मारक चाळीसगाव नगरीचे भूषण ठरेल. या स्मारकाचे अनावरण करण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.
याप्रसंगी विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस, आ. चंद्रकांत पाटील, खा. रक्षाताई खडसे, गिरीश महाजन, आ.राजू भोळे, आ. एस.के.पाटील, आ. संजय सावकारे, आ.चंदुभाई पटेल यांच्यासह हे स्मारक उभारण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले खा. उन्मेष पाटील, आ. मंगेश चव्हाण तसेच लक्ष्मण शिरसाठ, आप्पा कुडेकर, बापू शिरसाठ, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, नगराध्यक्षा आशालता पाटील, पालिका नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, शिवभक्त व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.