महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणामुळे मनोज जरांगे पाटील हे चर्चेतील विषय बनले आहे. त्यांची मातीशी नाळ असलेली भाषा तसेच विरोधकांवर केलेली फटकेबाजी यामुळे ते चर्चेत असतात.
अशातच त्यांनी एका वृत्तवाहिनीचा बूम हाती घेऊन त्यांच्याच नेतृत्वाखालील रॅलीचे वृत्तांकन केले आहे.
मी मनोज जरांगे बोलतोय, कॅमेरामॅन रॅलीचे दृश्य प्रेक्षकांना दाखवा असं ते म्हणताना दिसत होते.
यामुळे ते पत्रकार बनलेत का? असा प्रश्न पडला आहे.