आषाढी एकादशी जवळ आलीय अशातच महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाला प्रचंड गर्दी होणार असून या लाखो भक्तांसाठी शिंदे सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सुरु असतानाही वारकऱ्यांना विठ्ठलाचे मुखदर्शन घेता येणार आहे. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांची पूजा सुरु होण्यापूर्वी चार तास आधी दर्शनाची रांग बंद होत असे. त्यामुळे अनेक वर्षांच्या परंपरेला छेद देत घेतलेल्या या निर्णयाच सर्व स्तरातून कौतुक होत