एखाद्याला प्रसिद्धीच्या उंचीवर न्यावं आणि परत मातीत गाडावं हे सोशल मिडियाला चांगलंच जमतं.
काल सकाळपासून गौतमी पाटीलच्या विडिओ बद्दल WhatsApp, Facebook वर लिंक द्या, लिंक द्या सुरू आहे.
मुळात ती जेव्हा चुकली तेव्हा याच सोशल मिडियाने तिला माफी मागायला भाग पाडलं आणि तिने नम्रपणे माफी मागितली सुद्धा पण आज स्वतः सोशल मीडिया चुकला, तिने कोणाकडून माफी मागून घ्यावी...?
तिचा विडिओ फिरवणे बंद करा आणि जर ती या गोष्टींमुळे उध्वस्त झाली तर याचे जबाबदार हा सोशल मिडिया असेल आणि त्यानंतर महिलांना बंद खोलीत सुद्धा कपडे बदलताना भिंतीला डोळे आहेत का हे बघावं लागेल.
हे आपल्याला बदलावं लागेल ही आपली जबाबदारी आहेय...!!