16 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या भिवंडी तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिरोळे ग्रामपंचायती वर मनसे ने एकहाती सत्ता प्रस्थापित केली असून ,थेट सरपंच निवडीत वैजय मिळवील्या नंतर उपसरपंच निवडणुकीत मनसेच्या रविना मानकर यांनी शिवसेना उमेदवाराचा 6 विरुद्ध 3 मताने पराभव करीत सत्ता प्रस्थापित केली आहे.तालुक्यातील 31 ग्रामपंचायतिच्या निवडणूकीत दोन ग्रामपंचायतींवर मनसेने विजय संपादन केला होता.त्यामध्ये तालुक्यातील शिरोळे ग्रामपंचायत च्या सरपंच पदी लक्ष्मी लाथड या थेट निवडणुकीत विजयी झाल्या होत्या .त्यानंतर गुरुवारी पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत मनसे तर्फे रविना मानकर तर शिवसेने कडून जयदास मते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक घेण्यात आली.
ज्यामध्ये रविना मानकर या विजयी झाल्या.या घोषणे नंतर मनसे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकाच जल्लोष साजरा केला. मनसेने ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन केल्याने या गावाचा विकास इतर ग्रामपंचायती पेक्षा अधिक होईल व नागरिकांच्या विश्वासास सरपंच उपसरपंच यांसह ग्रामपंचायती सदस्य पात्र ठरतील असा विश्वास मनसे विद्यार्थी ठाणे जिल्हा अध्यक्ष परेश चौधरी यांनी व्यक्त केला आहे.