बंदी भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचा युवा नेतृत्वाचे सार्वत्रिक कौतुक
जिल्हा प्रतिनिधी- संजय जाधव
उमरखेड तालुक्यातील अत्यंत बंदीभागातील मतदार संघात वावरत असणारे, बबलू जाधव यांचा एक नवा चेहरा नवरूपाला आला आहे. त्यांनी एका नव्या पर्वाकडे वाटचाल केली आहे. त्यांनी प्रत्येक वेळ प्रसंगी प्रत्येक समाजाला वेगवेगळे उपक्रम राबऊन सहकार्य केले आहे. त्यांनी श्रावणबाळ योजने अंतर्गत अंदाजे १५०० ते १६०० महिला मंडळीचे प्रस्ताव दाखल करून योजनेचा लाभ मिळवून दिला. त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेमध्ये जवळपास २०० ते २५० महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी पर्यंत केले. त्यामध्ये काही अत्यंत गरजू रुग्ण असतील तर त्यांनी स्वतः पुसद, मेघेसावंगी, आदिलाबाद, नांदेड, यवतमाळ, या ठिकाणी जाऊन रक्तदान केले.
तसेच शिकलसेल ग्रस्त असलेल्या रुग्णाना अनेकदा रक्तदान करून मोलाचे कार्य केले. त्यांनी यावर्षी २६ जानेवारी ला प्रजासत्ताक दिनानिमित्त रक्तदान करून आजपर्यंत तब्बल ५१ वेळा रक्तदान केले. ही फारच कौतुकास्पद बाब आहे.
तसेच त्यांच्या गावी दरवर्षी किडनीच्या आजाराने पाच पंचेवीस लोक दगावतात, कारण पिण्याचे पाणी हे फ्लोराईड युक्त आहे. त्यामुळे त्यांचे ध्येय आहे कि, येत्या काळात लोकवर्गणीतून गोरगरिबांना मुबलक आणि मोफत शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी ते प्रयतशील आहेत. त्यांनी लोकसहभागातुन गावात येजा -जा करणाऱ्या रस्त्यावर मुरूम टाकून रस्त्याची २०१८ साली रस्त्याची दुरुस्ती केली होती. असे प्रत्येक सामाजिक व राजकीय उपक्रम गाजविणारा युवा पिढीचा युवा शिलेदार असून, येत्या जि. प. गटाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अश्या होतकरू चेहऱ्याला संधी द्यावी. जेणेकरून आणखी प्रभाविपने सेवा करता येईल. खरच एका अभ्यारण्यात वास्तव्य करणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तालुका अध्यक्ष पदाची धुरा दिली. त्याच पद्धतीने एकदा आगामी निवडणूक संधी द्यावी असे जनममत आहे.हा शिलेदार पाण्यासारखे रक्तदान करणारा, आधुनिक भारतातील दानवीर बबलू भाऊ जाधव यांच्यावर सार्वत्रिक कौतुकाची थाप पडत आहे.