प्रतिनिधी विनोद धुमाळ जांबुड
महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज यांच्या वतीने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना तेल घाण्याबद्दल माहिती देण्यात आली.
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संग्राम सिंह मोहिते पाटील रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. आर .जी. नलावडे प्रा. एस .एम .एकतपुरे ( कार्यक्रम समन्वयक), प्रा.एम .एम .चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) प्रा. सौ एच .व्ही .कल्याणी (कार्यक्रम अधिकारी ) यांच्या मार्गदर्शनानुसार कृषीदुत जयश शिंदे, विश्वजीत आदमाने, श्रेयस कुलकर्णी, आकाश माने, मेघराज पाडूळे, आदित्य कवळसकर, नवनाथ इरकर यांनी तेलगाना बद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी उपस्थितांना रिफाइंड तेलाचे आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत माहिती दिली.
तसेच तेल घाण्याचे ग्रामीण अर्थव्यवस्थेमधील महत्त्व पटवून दिले.