राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढला आहे. मात्र अजूनही याची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत. यावर सरकारने मंगळवार २० फेब्रुवारीला मराठा आरक्षणासाठी विधेयक मांडणार असल्याचे सांगितले आहे.