महाराष्ट्राच्या 6 जागांवरील राज्यसभेची निवडणुक बिनविरोध होणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीकेली आहे. सर्वांकडे पुरेसा कोटा आहे, त्यामुळे चुरस निर्माण करण्यात तथ्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.