केंद्र सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पावर अनेक अपेक्षा आहेत.
या अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी आर्थिक मदत 6 हजार रुपयांवरून 9 हजार रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.
गेल्या अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेसाठी 60 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, मात्र आता त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.