अकलूज येथे रत्नाई कृषी महाविदयालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण कृषि कार्यानुभव या उपक्रमाचा प्रारंभ भंडीशेगाव या गावच्या सरपंच सौ मनिषा यलमार यांच्या हस्ते करण्यात आला.त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.
यावेळी सरपंच मा.सौ मनिषा यलमार ,उपसरपंच विजय कदम, ग्रामसेवक गोरख नरसाळे, माजी सरपंच संजय रणखांबे उपस्थीत होते. शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे अध्यक्ष मा. संग्रामसिंह मोहिते-पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलावडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एम एकतपुरे यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रम संपन्न झाला . कार्यक्रमाचे आयोजन कृषीकन्या ऋतुजा महारनवर, श्वेता जाधव, प्रतिक्षा देशमुख, प्रेरणा माने-देशमुख, ज्ञानेश्वरी शिंदे, गीता जाधव, अतिया काझी, श्रध्दा पोळ, कोमल मोहिते, प्रियंका नवले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषिकन्या ऋतुजा महारनवर हिने केले . मा.सौ.मनिषा यलमार यांनी कार्यक्रमांचे अध्यक्ष स्थान भूषवले त्याचबरोबर माजी सरपंच संजय रणखांबे व कृषिकन्या प्रियंका नवले हिने आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर विद्यार्थिनीनी शेतकऱ्यांना कृषिविषयक सल्ला व मार्गदर्शन केले. त्यांनी कार्यक्रमांतर्गत माती परिक्षणाचे मुल्य, पिकांवरील रोगांची घ्यावयाची काळजी व उपाय, भरघोस उत्पन्न मिळविल्यासाठी नियोजन, शेतमाल निर्यात व साठवणूक याचे फायदे व तोटे याबाबतहरी मार्गदर्शन केले.सर्व ग्रामस्थांनी कार्यक्रम करण्यासाठी सहकार्य केले.
प्रतिनिधी विनोद धुमाळ जांबुड