पॉन्झी योजना बंद करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने उचललं पाऊल
राज्यातील पॉन्झी योजनांच्या वाढत्या प्रकरणांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांच्या शिफारशींवर काम करण्यासाठी एक अभ्यास गट स्थापन करण्यात येईल,असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले. गुरूवारपासून सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात ते बोलत होते. ते म्हणाले, जनतेच्या कष्टाच्या पैशाच्या लूटमारीच्या घटना कमी करण्यासाठी आम्ही नियम अधिक कडक करणार आहोत. यापूर्वी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह काही आमदारांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला होता.