विधान परिषदेत कालपासून (गुरूवार) मराठा आरक्षणावर चर्चेला सुरूवात झाली. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी भमिका सर्व मराठा आमदारांनी घेतली.
मराठ्यांना हक्काचे आणि न्यायालयात टिकणारे आरक्षण हवे असून इतरांच्या आरक्षणालला धक्का लावू नये असे आमदार विक्रम काळे म्हणाले.
जातिनिहाय जनगणनेची मागणी शेकापच्या जयंत पाटलांनी केली. मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची गरज नसून शिक्षण, नोकरीत आरक्षण पाहिजे, असे सुरेश धस म्हणाले.