दिवंगत कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील यांनी यशवंतराव चव्हाण, खा. शरद पवार यांच्या विचारांतून कमी खर्चात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली. जिल्ह्यात उसाला सातत्याने एक नंबरचा दर दिला.
हा आदर्श कायम राखताना उसाला सर्वात जास्त दर देऊ, अशी ग्वाही चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली.
कारखाना कार्यस्थळावर संस्थापक चेअरमन कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
चेअरमन पाटील म्हणाले की, यंदा नोंद झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेत गाळप केले जाईल.