मराठा आरक्षणावर सदाभाऊ खोत स्पष्टच बोलले 'प्रस्थापित मराठे गांजा ओढत होते की गोट्या खेळत होते? 'शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा
रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत कराड दौऱ्यावर असताना पत्रकारांसोबत बोलताना महत्त्वाचे विधान केले आहे. मराठा आरक्षण प्रश्नाच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. कोणीही मुळाशी जात नाही. आघाडी सरकाराने योग्या भूमिका न घेतल्याने फडणवीसांनी दिलेले आरक्षण टिकले नाही. प्रस्थापित मराठे 70 वर्षे सत्तेवर होते, ते काय गांजा ओढत होते की गोट्या खेळत होते? त्यांनी का मराठ्यांना आरक्षण दिले नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.