Type Here to Get Search Results !

कल्याण डोंबिवलीत नागरिकांचा टॅक्सचा पैसा पाण्यात



कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस गेले अनेक दिवसापासून चालू आहे , त्यामुळे सर्वत्र रस्त्याची चाळन झाली आहे , कित्तेक ठिकाणी अर्धवट रस्त्याची कामे , त्या मुळे डोंबिवली कल्याणचा नागरिक अक्षरशः वैतागून गेला आहे खड्यात रस्ते 

की रस्त्यात खड्डे असे अनेक डायलॉग 

गाणे या रस्त्यांवर काढले गेले. पण परिस्तिथी जैसे थे,   

            यातच या गेल्या 10 / 15 दिवसात पडलेल्या खड्यामदे खडी टाकून फक्त आणी फक्त रस्त्याची लाली पावडर केली जाते , व पुन्हा पाऊस आला की ती खडी वाहून जाते ,हे असे कित्तेक दिवस चालणार असा सवाल् आता डोंबिवलीकरान कडून विचारला जातोय , जनतेचे कराचे पैसे या पद्धतीने जर पाण्यात जात असतील तर आम्ही कर भरावा की नाही अशी काहीशी चिंता आता नागरीकामधे दिसून येत आहे. फक्त 

मतदानावेळी आठवण काढणारे लोक 

प्रतिनिधी नक्की आहेत कुठे असे प्रश्न नागरिक विचारात आहेत 

                प्रशासनाच्या गलथान कारभारावर एका डोंबिवली कराने महानगरपालिकेच्या कर्मचाराला जाब विचारलेला व्हिडिओ आम्हाला शेअर केला हे पाहून तरी कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना जाग येईल का व या थातुरमाथुर कामा ऐवजी थोडे दिवस तरी व्यवस्थित राहतील अशी उपाययोजना या रस्त्याची केली जाइल् का असे प्रश्न नागरिक विचारात आहेत.


प्रतिनिधी / भानुदास गायकवाड```

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad