प्रतिनिधी/ भानुदास गायकवाड
डोंबिवली एमआयडीसी पोस्ट/पासपोर्ट कार्यालयाचा आवारात सकाळी थोड्याफार पाऊसाने गुडघाभर पाणी साचले होते. अर्थातच पाणी साचण्याचे कारण की पोस्ट ऑफिस मागील बाजूस भूखंड भरणी, सपाटीकरण आणि विकास चालू आहे.
तेथे जाण्यासाठी सदर विकासाने पोस्ट ऑफिस बाजूने भरणी करतांना तेथे असलेला नैसर्गिक नाला बुजल्याने पाऊसाचे पाणी पोस्ट ऑफिस आवारात जमा झाले. पोस्टातील काही कर्मचाऱ्यांनी स्वतः कष्ट घेऊन पाणी जाण्यासाठी छोटा नाला तयार करून पाण्यासाठी वाट मोकळी केली त्यामुळे काही वेळातच पाण्याचा निचरा होऊन पोस्ट ऑफिस आवारातून पाणी निघून गेले.
आज नेहमीप्रमाणे पोस्ट आणि पासपोर्ट कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना काही वेळ थांबून या कार्यालयात जावे लागले आहे. एमआयडीसी मधील अनेक मोठ्या नाल्यांची साफसफाई केली नसल्याने एमआयडीसी भागात अनेक ठिकाणी पाणी साचत असल्याचे दिसत असून आजच्या पोस्ट ऑफिस मधील गुडघाभर पाणी साचण्याचा घटनेला KDMC आणि एमआयडीसी जबाबदार आहेत कारण त्यांनी ह्या नाल्यावर वेळीच लक्ष देऊन साफसफाई केली असती तर हे पाऊसाचे पाणी पोस्ट ऑफिसआवारात आलेच नसते. केडीएमसी/एमआयडीसी यांनी यावर कडक कार्यवाही करायला हवी अशी नागरिकन मधून मागणी जोर धरू लागली अशी.