जव्हार :-सोमनाथ टोकरे
गेल्या काही दिवसापासून जव्हार मोखाडा तालुक्यात उन्हाळा अंतिम टप्प्यात असताना उकाडा भयंकर वाढला होता .त्यामुळे सर्वसामान्य चाकरमानी हैराण झाला होता .काही कामानिमित्त घराबाहेर निघाल्यावर उन्हाच्या झळा लागून अंगामी लाही होऊन शरीरातून घामाच्या धारा निघत होत्या .ऐन उन्हात बाहेर फिरणेही अशक्य झाले होते.
जून महिना संपायला आला तरीही पाऊस पडण्याचे चिन्ह दिसत नव्हती मात्र शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण झाल्याने वादळी पावसाने रविवारी रात्री एकाएकी हजेरी लावल्याने सामन्यांची चांगलीच तारांबळ उडाली तर त्यातच महावितरणाची काही तास बत्तीगुल होऊन लपंडाव सुरू होता .जव्हार मोखाडा तालुक्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.
तालुक्यातील शेतीच्या मशागतीची राबनीची कामे संपल्याने बळीराजाच्या नजरा आभाळाकडे खिळल्या होत्या.शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत होता.हवामानात दैनंदिन तापमान वाढून उष्णता वाढली होती.परंतु पाऊस पडत नव्हता .मात्र रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने बळीराजाची चिंता मिटली आहे तर सोमवारी पहाटे शेतकरी वर्ग हा पेरणीच्या कामाला लागला आहे यामध्ये भात ,नागली , वरई,या धान्याच्या पेरणीला सुरुवात झाली आहे जून महिन्यात अखेरीस पावसाने सुरुवात केल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. उष्णतेची लाट कमी होवून तापमानात गारवा .जाणवू लागला आहे.त्यामुळे उष्णतेने त्रस्त झालेला चाकरमानीही सुखावला आहे.