Type Here to Get Search Results !

वारकऱ्यांना दिलेल्या सुविधांबाबत आपण समाधानी येत्या काळात शेतकरी बळीराजा सामान्य नागरिक सुखी होऊ दे पाऊस पडू दे इतकच मागणं विठ्ठलाकडे



पंढरपुरात वारकरी भक्तांना चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या आहेत हे पाहून समाधान वाटत आहे. वारकरी संपूर्णपणे खुश आहेत. पंढरपूर देखील खड्डे मुक्त होत आहे यासाठी आपण निधी दिला होता ते पूर्णत्वाकडे झाले आहे. त्यामुळे येता काळात शेतकरी बळीराजा सामान्य नागरिक सुखी होऊ दे पाऊस पडू दे इतकच मागणं विठ्ठलाकडे आहे. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपुरात येऊन आषाढी यात्रे पूर्वी वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा घेतला यावेळी त्यांच्या सोबत मंत्री गिरीश महाजन आमदार समाधान आवताडे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर उपस्थित होते.

पंढरपुरात प्रत्येक विठ्ठल भक्ताला दर्शन घेण्याचा अधिकार आहे विठुराया सर्वांचा आहे. असे सांगत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या संभाव्य पंढरपूर दौऱ्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad