राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सिंधी समाज आक्रमक झाला आहे.
उल्हासनगरमधील एका कार्यक्रमात आव्हाडांनी सिंधी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे संतापलेल्या सिंधी समाजाने आव्हाडांच्या विरोधात निदर्शने करत त्यांची आमदारकी रदद् करण्याची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे. आमदार जितेंद्र आव्हाडांयानीं सभेत बोलताना सिंधी समाजास कुत्र्यांची उपमा दिली असल्याचा आरोप सिंधी समाजाकडून केला जात आहे.