संजय राऊतांनी शरद पवारांचा राजीनामा तसेच अजित पवारांची नाराजी यावर अनेकवेळा भाष्य केलं. सामनातून तर पवार वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचं देखील म्हटलं. यावरून आता महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीत मिठाचे खडे टाकू नका, भान ठेवून बोला, भान ठेऊन लिहा, असा सल्ला छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवारांनी दिला आहे. विशेष म्हणजे पवारांनीही राऊतांना आमच्या घरचा मामला असल्याचं सांगतं फटकारलं आहे.