बोलून बोलून संजय राऊतांची मान किती बारीक झाली, ते एक दिवस, गौप्यस्फोटावरून शहाजीबापू पाटलांनी हल्लाबोल केला. गेले चार महिने राऊत गौप्यस्फोटाची भाषा करीत आहेत, पण पुढे काय झाले, असा प्रतिसवाल बापूंनी केला.
ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी दोन दिवसात प्रत्युत्तर दिले आहे. राज्याच्या राजकारणात गौप्यस्फोट होणार असल्याचे वक्तव्य केले. यावर शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत गेल्या चार महिन्यांपासून गौप्यस्फोटाचा दावा करत आहेत, याकडे मोठे गौप्यस्फोट होतील असे संजय राऊत चार महिन्यांपासून दररोज सकाळी बोलत आहेत. तसं झालं का? ४ महिन्यांपासून बोलून बोलून संजय राऊत यांची मान किती बारीक झाली आहे. ते एक दिवस बोलता बोलता चक्कर येऊन खाली पडणार असे यावेळी शहाजी बापू पाटील म्हणाले.