कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे.
राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाला आहे. इतर राज्यांमध्ये मतांची टक्केवारी वाढली तर त्यांना पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल, म्हणून ते टक्केवारीसाठी निवडणूक लढवत आहेत.
भाजपची टक्केवारीची निवडणूक वेगळी आहे, राष्ट्रवादीची वेगळी असल्याचा टोलाही पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे.
कर्नाटकातील निपाणीमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलत होते.