Type Here to Get Search Results !

मोठ्या उत्साहात जागृत महाराष्ट्र राज्य स्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न




शिक्षण महर्षी प्राचार्य अजय कौल सर व एकता मंच उपाध्यक्ष प्रशांत काशीद सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला पुरस्कार सोहळा 


आमदार सुनिल प्रभू व आमदार ऋतूजा लटके यांच्या उपस्थीत दिला पुरस्कार




समाज हा केवळ नैतिक मुल्यांच्या आधारावरच टिकुन आहे . सामाजिक बांधिलकी जपणारी अनेक माणसं जेव्हा या समाजाच्या उत्कर्षासाठी धडपडतात तेव्हा कुठे एक निकोप समाज आकार घेत असतो. अश्या लोकांचे कार्य हे इतरांना प्रेरक ठरते...आणि सामाजिक दायित्वाचा हा कारवा अखंड चालत राहतो. म्हणुनच अश्या व्यक्तीमत्वांचा गौरव करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे.म्हणून जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक/संचालक अमोल भालेराव,संचालक सुरज भालेराव,कार्यकारी संपादक पंकज हेलोडे , मॅनेजमेंटटीम, आशा  ब्रहाम्हणे ,जय गुप्ता ,गजानन बनसोड, अविनाश ओवळे, नितिन मोहिते,जिल्हा प्रतिनधी नागनाथ ससाणे,सतीश वाघमारे, रामदास चव्हाण यांच्या तर्फे जागृत महाराष्ट्र न्युज चॅनल यांच्या ४थ्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करत  सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ,विविध क्षेत्रात आपलं नाव,देशाचे नाव उज्ज्वल करणारे,समाजाला प्रगतीपथावर नेणाऱ्या आशा अनेक जागृत जनांचा सन्मान, सत्कार जागृत महाराष्ट्र न्यूज तर्फे करण्यात आला..




गेल्या वर्षी मुंबईत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या  हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.याही वर्षी जागृत महाराष्ट्र न्यूज तर्फे..28 मे सायंकाळी 5:30 ते 9 वर्सोवा ,यारी रोड, अंधेरी पश्चिम येथील प्रतिष्ठित  ठिकाण  समजले जाणारे CWC कॉलेज येथे हा भव्यदिव्य पुरस्कार सोहळा संपन्न झाला.... यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिंडोशी विधानसभा आमदार सुनिल प्रभू, अंधेरी पूर्व विधानसभा आमदार ऋतुजा लटके, मा. श्री. अजय कौल सर शिक्षण महर्षी - अध्यक्ष - एकता मंच, मा. श्री. प्रशांत काशीद सर उपाध्यक्ष - एकता मंच,  मा. सौं. संगीता संजय सुतार (मा. प्रभाग समिती अध्यक्षा, मा. नगरसेविका ), मा. श्री. गणेश गंगाधरण ( वरिष्ठ फिम्स साउंड डिझायनर, साऊंड ), मा श्री. देवेंद्र "बाळा" आंबेरकर (समन्वयक वर्सोवा विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे ), लातूर जिल्ह्यातील विराळ गावचे सरपंच संतोष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न पुरस्कार सोहळा संपन्न झाला..

  या प्रसंगी शिक्षणमहर्षी अजय कौल सर,एकता मंच उपाध्यक्ष प्रशांत काशीद यांनी जगृतला पुढील वाटचलीसाठी शुभेच्या दिल्या..तसेच

या याप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलतांना आमदार सुनील प्रभू, आमदार ऋतुजा लटके यांनी जागृत महाराष्ट्रला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच आज प्रसार माध्यम टिकणे काळजी गरज असल्याचे सांगत जागृत महाराष्ट्रच्या कार्याला अशीच गती मिळो अश्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जागृत महाराष्ट्र संपादक अमोल भालेराव यांनी सांगितले की जनतेला आज लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी लोकवर्गणीतून माध्यमे चालणे गरजेचे आहे.. तरच असे प्रसार माध्यम निःपक्षपाती कार्य करतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad