Type Here to Get Search Results !

सांगोला | शहाजी बापू पाटील व नाना पटोले यांचं एकमेकावर टीकास्त्र



ज्याला खालचं वरचं कळत नाही त्याला कारभारी केलंय. काँग्रेसकडे दुसरं कोणी नासेल म्हणूनच नाना पटोले यांना अध्यक्ष केलं असून राजकारणामध्ये सक्रिय नेत्यांपैकी सर्वात कमी बुद्धी असेलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले आहेत, अशी खरमरीत टीका करत सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी नाना पटोले यांना उत्तर दिलं.



काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगोला दौऱ्यावर आले असताना सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर टीका केली होती.


त्यावर आज त्यांनी उत्तर दिल आहे.उत्तर देताना आमदार शहाजी बापू पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याला आता काँग्रेसकडून उत्तर देण्यात येत आहे.



काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी शहाजी पाटलांना प्रत्युत्तर देत म्हटले की, "मुळात शहाजी बापू पाटलांची नाना पटोले यांच्यावर बोलण्याची लायकी नाही, 'ज्याचं खावं मीठ, त्याला घोडा लावावा नीट' ही म्हण त्यांना तंतोतंत लागू होते.


काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आमदार झालेले आज काँग्रेसच्या नेतृत्वावर टिका करतात ज्या शिवसेनेनी त्यांना तिकीट दिल व आमदार केल, त्या उद्धव ठाकरेंवर ही हे टिका करतात.



ते पुढे म्हणाले की, ज्याचं मीठ खायचं त्याच्याशी गद्दारी करण्याची शहाजी बापू पाटलांची परंपरा जुनी आहे आणि ते पुढे पाळत आहेत. आमदार शहाजी बापू पाटलांची अवस्था "तमाशातील तुणतुण्या सारखी".


शिंदे सरकारमधील शहाजी बापू पाटील हे तुणतुणे आहेत असे म्हणत काकासाहेब कुलकर्णी यांनी शहाजी बापू पाटलांवर बोचरी टीका.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad