वसंतराव काळे कारखान्याची निवडणूक लढवण्याचा अभिजित आबा पाटील यांचा निर्धार
पंढरपूर येथील वसंतराव काळे कारखान्याच्या निवडणुकीसाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी रणशिंग फुंकले. कोणत्याही परिस्थितीत कारखान्याची निवडणूक लढवणार असा निर्धार अभिजित आबा पाटील पाटील यांनी केला,
निवडणुक संदर्भात विचार विनिमय सभासद व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत पाटील यांनी कारखान्याच्या निवडणूकी विषयी सभासदांची मते जाणून घेत, यावेळी अनेक सभासदांनी निवडणूक लढवावी असा आग्रह हि धरला, त्यानंतर अभिजीत पाटील यांनी निवडणूक लढवणार अशी घोषणा हि केली. अभिजित आबा पाटील यांच्या घोषणेमुळे कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कारखाना निवडणूकीच्या निमित्ताने पंढरपुरात राजकीय रणधुमाळी पाहायला मिळणार.