संजय राऊतच राज्यातील सगळ्यात मोठे गुंड
शिंदे गटातील काही आमदार अस्वस्थ असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केले. यानंतर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी त्यास उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून संजय राऊतच अस्वस्थ असल्याचा टोला त्यांनी लगावला. आयोधया वारी वरून गुंड म्हणून टीका करणारे, संजय राऊत हे राज्यातील एक मोठे गुंड आहेत. अडीच वर्षांपूर्वी त्यांनी 55 आमदारांची चोरी करून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत नेले असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
तसेच आपल्या सांगोला मतदारसंघात ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या संमेलनाचा संमेलना अध्यक्ष आपण असल्याने आपण अयोध्येला गेलो नाही हा कार्यक्रम तीन महिन्यापूर्वीपासून नियोजित होता माझ्यामुळे 700 साहित्यिकांना त्यांच्या कार्यक्रमाच्या तारखा बदलाव्या लागल्या असत्या म्हणून आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परवानगी घेऊनच सांगोला येथे साहित्य संमेलनात उपस्थित असलेले देखील यावेळी आमदार शहाजी बापू म्हणाले.