पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन
जव्हार प्रतिनिधी :- सुनिल जाबर
धानिवरी डहाणू पालघर मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे प्रकरण संदर्भात सध्या संपूर्ण महाराष्ट्र भर धुमाकूळ घातला आहे . आज ६ वा दिवस असून या प्रकरणाची दखल अजून सरकारने घेतलेली नाही याचाच पाठपुरावा करत पालघर जिल्यातील आमदार विनोद निकोले साहेब ,आमदार सुनिल भुसारा साहेब ,आमदार श्रीनिवास वनगा साहेब ,आमदार राजेश पाटील साहेब , माजी खासदार यांच्या पुढाकाराने आज दिनांक २५ एप्रिल २०२३ रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय समोर 'आदिवासींना न्याय मिळालाच पाहिजे 'अश्या घोषणा देत ठिय्या आंदोलन करण्यात आले.
पालघर जिल्हाधिकारी सोबत चर्चा निष्फळ ( फिस्कटली ) आहे.चारही आमदारांच्या प्रयत्यांना धुडकावून घरखालील जमीन ,झाडांचा मोबदला ,अन्यायी अधिकाऱ्यांचे निलंबन ,ऐन पावसाळ्याच्या तोंडावर बेघर झाल्याने पाऊस पावसाळ्याच्या आधी घरांची बांधणी करून दिले पाहिजे .पारंपरिक देवस्थानचे पुनवर्सन असे अनेक प्रश्न घेवून पालघर जिल्यातील सर्व आमदार ,आदिवासी एकता परिषद कार्यकर्ते व सामाजिक संघटना कार्यकर्ते आज संध्याकाळी ५ वाजे पर्यंत पालघर जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले.