काळे-भालके गटाकडे मतदारांचे लक्ष
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाला अवघे २ दिवस उरले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी प्रशांत परिचारक गटासमोर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी तगडे आव्हान निर्माण केले आहे.
मात्र निर्णायक ठरणाऱ्या काळे-भालके गटाच्या नेत्याकडून कोणता निर्णय येणार याकडे काळे-भालके गटाच्या मतदारांचे लक्ष लागून.
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी परिचारक गटाच्या विरोधात विठ्ठल परिवाराने विरोधकासमोर तगडे आवाहन निर्माण केले होते.
अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत कल्याणराव काळे व भगीरथ भालके गटाकडून व्यापारी व हमाल तोलार मतदारसंघ वगळता सर्व जागेवर अर्ज दाखल केलेले होते. तर चेअरमन अभिजीत पाटील गटाकडूनही हमाल तोलार व व्यापारी, अनुसुचित जाती जमाती, आर्थिक दुर्बल व संस्था मतदार संघ वगळता इतर मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केले होते. विठ्ठल परिवारात विभागलेल्या अभिजीत पाटील व काळे-भालके गटाचे मनोमिलन झाल्यास सत्ताधारी परिचारक गटासमोर कडवे आव्हान उभे करता येईल या हेतून परिवरातील काही पदाधिकाऱ्यांनी कल्याणराव काळे व भगीरथ भालके व अभिजित पाटील गटाचे मनोमिलन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही.
अभिजित आबा पाटील यांनी या निवडणुकीत "एकला चलो रे" ची भुमिका घेत अर्ज भरून उमेदवारांचा पॅनेल उभा केला. तर काळे भालके गटाचे नेत्यांनी आपले कायकर्त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले.
या निर्णयामुळे काळे-भालके गटाकडून कोणता निर्णय घेतला जाणार अशा प्रकारची चर्चा सर्व तालुक्यात सुरु असतानाच अतिशय सावध पवित्रा घेत कल्याणराव काळे यांनी काळे-भालके गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेत या बैठकीत बहुतेक पदाधिकारी नेते मंडळी जो निर्णय घेतील तो आपणास मान्य राहिल असा सुर आळवला
यावेळी कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून घेत निवडणुकी पुर्वी एक दिवस अगोदर मतदानाबाबत निर्णय घेण्यात येईल तो पर्यंत कार्यकर्त्यांनी शांत रहावे असा सबुरीचा सल्ला यावेळी दिला.