अखेर तोडगा निघाला! कर्मचाऱ्यांची संप मागे घेण्याची घोषणा; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर निर्णय, चर्चेत नेमकं काय ठरलं, पहा
राज्य कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत हा संप असाच सुरू राहील असं म्हटल होत. आज संपाचा सहावा दिवस होता आणि शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून आज राज्य कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची मोठी घोषणा केली आहे.
यामुळे नेमकं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत काय घडलं, काय तोडगा काढला गेला? जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी राज्य शासनाने मान्य केली का? यासारखे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार नुकत्याच पार पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत जुनी पेन्शन योजनेच्या मागणीवर विस्तृत चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या आगामी तीन महिन्यांमध्ये राज्य शासनाकडून पूर्ण केल्या जातील अस आश्वासन शिंदे फडणवीस सरकारने दिले आहे.