मोहोळ : सय्यद वरवडे येथे डोक्याच्या आजराला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे येथे डोक्याच्या आजराला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने बाभळीच्या झाडाला गोपनेच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. २५ मार्च २०२३ रोजी सय्यद वरवडे येथील माने वस्ती येथे ही घटना घडली. रामकृष्ण युवराज माने (वय २३) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हणुमंत लक्ष्मण माने (वय 45 वर्षे) यांच्या भावाचा मुलगा रामकृष्ण याचा दोन वर्षापुर्वी अपघात झाला होता. तेव्हा त्याच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे त्याला डोक्याचा आजार जडला होता. त्या आजाराला तो कंटाळला होता. त्यावरून त्याने बाभळीच्या झाडाच्या फांदीला गळफास घेवुन आत्महत्या केली, असं दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.