ढाणकी येथे वाऱ्यामुळे गहू पिकांचे नुकसान शेतकरी त्रस्त ढाणकी
प्रतिनिधी ,दिगांबर शिरडकर
भारत हा कृषिप्रधान देश मानला जातो परंतु याच कृषी प्रधान भारत देशामध्ये शेतकरी हा एकापाठोपाठ एक अशा संकटाचा सामना करत आहे. कधी असमानी संकटाचा तर कधी सुलतानी संकटांचा पेरणी पासून तर काढणीपर्यंत त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.खत, बी ,बियाणे, गावाच्या सव्वा पटीने खर्च करून त्यातच पिकांवर रोगराई यामुळे औषधीचा अतिरिक्त खर्च व निसर्गाच्या सततच्या बदलामुळे उत्पन्नात घट सुद्धा यामुळे शेतकरी आधीच मेटा कुतीस आला असताना , गेली दोन दिवस झाली वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे गहू पीक हा पूर्णतः जमिनीवर पडला गेला असून एन भरण्याच्या अवस्थेमध्ये हाता तोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.त्यातच 3000 ते 3500 रू असलेला गहू आज मार्केटला 2200 ते 2300 या दराने विकल्या जात आहे.उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्याने कितीही नियोजन केले तरी अनियमित निसर्गाच्या बदलामुळे शेतकरी हा हतबल झालेला दिसून येत आहे.पूर्ण नियोजन करून शेतकऱ्यांच्या पुढे अशी वादला सारखी संकटे वरचे वर येणे हे आव्हानच आहे. नुकसान झालेल्या भागात सरकार मायबाप पिकांचे पंचे नामे करणार का?शेतकऱ्याला दिलासा मिळणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे