Type Here to Get Search Results !

वाकी गावातील श्रमदानातून तरुणांनी बांधला वनराई बंधारा






वाकी गावातील श्रमदानातून तरुणांनी बांधला वनराई बंधारा

पालघर जिल्हा प्रतिनिधी : सुनिल जाबर




    आज वाकी येथील तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला."पाणी अडवा पाणी जिरवा" ही संकल्पना समोर ठेवून तरुणांनी बंधारा बांधला.
      पावसाळ्यात पाणी पडल्यावर वाहून जाते.परिणामी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण होते यावर कुठे तरी मात व्हावी यासाठी हा छोटासा प्रयत्न वाकी गावातील तरुण मंडळांनी केला आहे.या पाण्याचा उपयोग गाई - गुरांना,पशूपक्षांना ,जनावरांना पिण्यासाठी तसेच नागरिकांना पिण्यासाठी तसेच नागरिकांना धुण्या - भांड्या साठी वापर व्हावा त्याचप्रमाणे हे पाणी वाहत न जाता ते जमिनीत मुरावे आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी या साठी हा वाकी येथील तरुणांनी पुढे येवून केलेला छोटासा प्रयत्न करत एक सुदंर संदेश दिला आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद महाकाळ ,भूषण महाकाळ,यतीन मिसाळ,अविनाश महाकाळ,स्वप्नील मिसाळ,चेतन महाकाळ,ऋतिक टोपले व इतर वाकी गावातले तरुण उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad