Type Here to Get Search Results !

रानडुकराच्या हल्ल्यात कंचली येथील शेतकरी गंभीर जखमी




रानडुकराच्या हल्ल्यात कंचली येथील शेतकरी गंभीर जखमी

किनवट प्रतिनिधी: गजानन वानोळे

किनवट तालुक्यातील मौजे कंचली येथील भिक्कू रुपला जाधव वय वर्षे 60 शेत सर्वे नं 83 आपल्या शेतातील हाता तोंडाशी आलेल्या खरीप पिकाची राखण करीत असलेल्या शेतकऱ्यावर रानटी डुकराने हल्ला करून गंभीर जखमी केले ही घटना आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली आहे भिकू रुपला जाधव असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून, त्यांना पुढील उपचारासाठी तेलंगणा राज्यातील म्हैसा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याकडून आर्थिक मदतीची मागणी होत आहे. सध्याच्या परिस्थितीत रानडुकराच्या वाढत्या संख्येने तालुक्यातील शेतकरी संकटात सापडलेला आहे शेतातील पीक नष्ट करणे , शेतकऱ्यावर हल्ला करणे अशा अनेक प्रकारचे नुकसान रानडुकरामुळे होत असून शासनाने याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.सातत्याने होणाऱ्या हल्ल्यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वन विभागाने रानडुकराचा बंदोबस्त करावा अशी मागणी तालुक्यातून होत आहे मात्र वन विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad