निरक्षर लोकांना साक्षर करण्यासाठी राष्ट्रीय अभियान सुरू करण्यात आले.राज्यात 2012 पासून प्रत्येक्षात याची सुरूवात झाली या अभियाना अंतर्गत प्रेरक प्रेरीकांची ग्राम लोकशिक्षण समिती व तालुका लोक शिक्षण समिती यांच्या मार्फत निवड करण्यात आली.प्रेरकांना 2 हजार मानधन देण्यात येत होते.2018 पासून सदरील योजना बंद केल्याने प्रेरकावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे प्रेरक संघटनेच्या वतीने अंशकालीन दर्जा द्यावा , नवीन योजनेत समावेश करावा , ऑनलाईन ऑफलाईन सर्व प्रेरकांचे थकीत मानधन द्यावे , यासह आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य साक्षर भारत प्रेरक प्रेरीका संघाच्या वतीने जिल्हा परिषदेवर भव्य दिव्य मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चा मध्ये नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून प्रेरक प्रेरीका सहभागी झाले होते. दरम्यान प्रेरकांनी काढलेल्या मोर्चात जिल्हा परिषदेच्या आवारात आला असता आंदोलन कर्तेनी प्रवेश द्वारा जवळ ठिय्या मांडला.त्यामुळे जिल्हा परिषद येणारे जाणारे अडकून पडले होते.रस्तावरही वाहतूक ठप्प झाली होती.आले नंतर आंदोलन कर्तेनी आपल्या मागण्या चे निवेदन जिल्हा परिषद शिष्ठ मंडळांना दीले.या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष माणिक कांबळे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पतंगे ,मोहन जाधव , पांडुरंग चिखलभोसीकर , शहाजी पाटील , उध्दव चौंडे , आत्माराम राजेगोरे , गंगाधर वासणीकर , संघपाल मुनेश्वर , विशाल भालेराव , पार्वती केंद्रे , आशाताईं शिंदे , व बीड जिल्ह्यातील प्रेरक प्रेरीका संघटना चे जिल्हा अध्यक्ष नांदेड काळे सर जाधव व त्यांची टीम हजर होते जिल्ह्यातील सर्व प्रेरक प्रेरीका उपस्थित होते.
91 इंडिया न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव ईस्लापुर