राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. त्यामुळे अनेक राजकीय घडामोडींना वेग येताना पाहायला मिळत आहे. अशात भाजप नेते अशोक चव्हाणांनी शनिवारी मध्यरात्री अचानक आंतरवालीत मनोज जरांगेंची भेट घेतली. रात्री 11.30 वाजता सुरू झालेली बैठक मध्यरात्री 1.30 वाजता संपली. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली. सरकारकडून सगेसोयरेबाबत फसवणूक झाल्याचं देखील जरांगे यांनी म्हटलंय. सरकारकडून आंदोलकांवर दबाव आणून विनाकारण गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप अशोक चव्हाणांसमोर केला.