माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस सोडल्यानंतर आणखी एका बड्या नेत्याने पक्ष सोडला आहे.
माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी काँग्रेस सोडली असून ते भाजपच्या वाटेवर आहेत.
त्यामुळे मराठवाड्यात पक्षाला आणखी एक खिंडार पडले आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र समजले जाणारे बसवराज पाटील यांच्या पक्ष सोडण्याने लातूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठे नुकसान होणार असल्याचे बोलले जातेय.