महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज यांच्या वतीने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना मुरघास (सायलेज) तयार करणे बाबत माहिती देण्यात आली.
अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संग्राम सिंह मोहिते पाटील रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. आर .जी. नलावडे प्रा. एस .एम .एकतपुरे ( कार्यक्रम समन्वयक), प्रा.एम .एम .चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) प्रा. सौ एच .व्ही .कल्याणी (कार्यक्रम अधिकारी ) व प्रा. डी एस. मेटकरी यांच्या मार्गदर्शनानुसार कृषीदुत जयश शिंदे, विश्वजीत आदमाने, श्रेयस कुलकर्णी, आकाश माने, मेघराज पाडूळे, आदित्य कवळसकर, नवनाथ इरकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.शेतकऱ्यांना मुरघास तयार करणे , जनावरांच्या आहारात मुरघासाचे महत्त्व, याबाबत माहिती दिली.
शेतकऱ्यांचा प्रतिसाद
कृषी मित्रांनी मुरघास तयार व साठवण करणेबाबत दिलेल्या माहितीमुळे शेतकऱ्यांना मुरघासाचे महत्त्व पटले.